वाळवा

वाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे.आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी . या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक जिवंत रसरशीत कर्तबगार गाव.वाळवा तालुका हा सांगली शहराच्या

वाळवा गाव स्थान

वाळवा गाव स्थान :वाळवा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई पासून ३४७ किलोमीटरवर, सांगली पासून ३३ किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतहरावर आहे.व इस्लामपूर पासून 10 किलोमीटर वर आहे

भौगोलिक

गावापासून कृष्णा नदी वाहते.

शेती

वाळवा येथील पिकाऊ जमीन अंदाजे २१ हजार एकर आहे. जमीन काळीभोर,कसदार असून प्रथम पासून या परिसरातील कष्टाळू शेतकरी विविध प्रकारची शेती उत्पन घेत आहेत.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

इतिहास

कर्मवीर भाऊराव पाटलांची पाऊले इथे उमटली .१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात आख्खे वाळवा गाव उतरत असे ब्रिटिशांच्या ११३ देशातील अवाढव्य साम्राज्यामध्येही स्वातंत्राची बेटे असणारया मोजक्या गावात वाळव्याचा उल्लेख गौरवाने करावा लागेल .या काळात अगदी स्त्रियादेखील प्रभात्फेरीमध्ये स्वातंत्र्याची गाणी गात कमालीच्या निर्भयपणे सामील होत असत.साचा:क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ग्रंथ

क्रांतिसिंह नाना पाटील जीवनाच्या अंतिम क्षणात वाळव्यामध्ये राहीले.वाळवा त्यांची कर्मभूमी होती.क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हे युगपुरुष वाळव्याचेच.नागनाथअण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या करिता झटत राहीले.त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ज्या भारताची स्वप्ने पाहिली होती, ती सगळीच साकार झालेली नाहीत. परंतु स्वातंत्र्यानंतर हा देश घडावा म्हणून त्यांनी जे कष्ट घेतले, जी चळवळ उभारली त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बालवाडी सुरू केली. त्यातूनच शाळा, मग महाविद्यालय सुरू केले. प्रगतीच्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांनाही सहभागी करून घेता यावे म्हणून त्यांनी हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना सुरू केला. सहकारक्षेत्रातला तो एक क्रांतिकारी प्रयोग ठरला. सामाजिक विचारांनी प्रेरित व्यक्ती अनेकदा व्यवसायात अपयशी ठरतात किंवा टोकाची भूमिका घेऊन वागतात. अण्णांनी त्यावर मात केली. कारखाना उत्तम चालवून दाखवला आणि तरीही स्वतःचे रूपांतर कारखानदारात होऊ दिले नाही. स्वतःमधील सामाजिक आंदोलक त्यांनी सुस्तावू दिला नाही.साचा:क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ग्रंथ

वाळव्यातले प्रमुख भाग

१) माळभाग

२) हाळभाग

३) पेठभाग

४) कोटभाग

५) चांदोली वसाहत

६) लक्ष्मी नगर

७) गणेश नगर

८) सव्वाशे मळा

९) क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी श्रमिक नगर

१०) अहिरगल्ली, माळभाग

११) आचरे मळा

12) फुलेनगर

हाळभागावर मोठ्या संख्येने पाटील, मोटे, थोरात इ. हे लढवैय्ये लोक राहतात.

धार्मिक

मंदिरे

वाळवा गावात रेणुकामाता मंदिर,गणपती मंदिर,गुरुदेव दत्त मंदिर,अंबामाता मंदिर,महादेव मंदिर,मारुती मंदिर,लक्ष्मी मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,बिरोबा मंदिर कोटभाग व हाळभागा वरती जैन मंदिरे अशी मंदीरे आहेत.

       तसेच वाळवा गावातील कोटभागावर दक्षिण भारतातील मंदिरे आढळून येतात. या मध्ये प्रामुख्याने श्री.विष्णू मंदिर (सध्या फक्त अवशेष शिल्लक आहेत).श्री.विठ्ठलाच्या मंदिराला लागून श्री.बालाजी मंदिर आहे.त्या मंदिरात माता भुदेवी व माता श्रीदेवी व गरुड आणि हनुमंत आहेत.तसेच या मंदिराला लागून श्री.विष्णू दशावतार मंदिर आहेत.अवतार दहा असले तरी या मंदिरात एकूण 13 मुर्त्या आहे.या मंदिराला लागून अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे.वाळव्यात असलेला शिवमंदिरापैकी सर्वात मोठे शिवलिंग असणारे हे मंदिर आहे.तसेच नदीमध्ये एकूण 305 शिवलिंग आहेत असे म्हंटले जाते पण नागठाणे बंधारा बांधल्यानंतर बराचसा भाग बुडाला आहे.व पाणी कमी झाल्यानंतर काही शिवलिंग दिसतात.

औद्योगिक

वाळवा येते पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. वाळवा येतील सहकारी क्षेत्रातील कारखान्यामुळे शेतकरयाची शेती बागायती झाली आणि अनेक छोटे मोठे उद्योग निर्माण झाले. सर्वसामान्याची क्रयशक्ती वाढली. केवळ ऊस बागायती शेतीवर अवलंबून न राहता द्राक्षे आणि गुलाबाच्या फुलांची निर्यात परदेशातही परदेशातही होवू लागली. ठिबकसिंचन,स्प्रिंकलर इ.साधनाचा करून साधनांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पन वाढवले.आजचा आधुनिक शेतकरी अधिक उत्पनासाठी आधुनिक शेतीकडे वळला आहे.विविध प्रकारच्या जलसिंचन योजना राबवल्या मुळे वाळवा परिसरातील बहुतेक क्षेत्र ओलिताखाली आली आहे. वाळव्यामध्ये विविध बँका आणि पतसंस्थाचे जाळे असल्यामुळे शेतीसाठी आणि शेती पूरक उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण नाही.

औद्योगिक शैक्षणिक आणि वित्तीय संस्था :१) पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथअण्णा नगर२) हुतात्मा सहकारी दुध संघ वाळवा ३) हुतात्मा बझार४) हुतात्मा सहकारी बँक ५) सहवीज निर्मिती प्रकल्प६) इथेनॉल प्रकल्प७) किसान शिक्षण संस्था८) जिजामाता विद्यालय९) सावित्रीबाई फुले वसतीगृह१०) किसान नं. १ पाणी संस्था११) हुतात्मा किसन अहिर विद्यालय१२) क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय१३) राजाराम विद्यालय१४) विविध इरिगेशन संस्था१५) विविध विक्री संस्था१६) हुतात्मा प्राथमिक विद्यालय१७) हुतात्मा नानकसिंग वसतीगृह१८) बँक ऑफ बडोदा१९) अपना बँक२०) राजारामबापू सहकारी बँक२१) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक22) ST TECH

वाळव्यातले प्रमुख 

मा. दिलीपकुमार पाटील (तात्या) , जिल्हा परिषद सदस्य मा. राजेंद्रकुमार पाटील (भाऊ) , मा. नेताजी पाटील, शक्तिसिंह पाटील (भैय्या), वैभव नायकवडी ,मा. गौरव(भाऊ)नायकवडी,मा.चेरमन शामराव सव्वाशे (काका), धनाजी आचरे(साहेब), नंदकुमार शेळके, नझीर वलाडकर, सुषमा नायकवडी, निलेश प्रकाश थोरात,दिपक धनवडे, किरन नायकवडी,विकम शिदे, संदेश कांबळे,

       ७.२ सामाजिक       ७.३ शासकीय
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत