न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २२ सप्टेंबर – २९ ऑक्टोबर २०१६ | ||||
संघनायक | विराट कोहली (कसोटी) महेंद्रसिंग धोणी (ए.दि.) | केन विल्यमसन रॉस टेलर (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चेतेश्वर पुजारा (३७३) | ल्युक रॉंची (२००) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (२७) | ट्रेंट बोल्ट (१०) मिचेल सॅंटनर (१०) | |||
मालिकावीर | रविचंद्रन अश्विन (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (३५८) | टॉम लॅथम (२४४) | |||
सर्वाधिक बळी | अमित मिश्रा (१५) | टीम साउथी (७) | |||
मालिकावीर | अमित मिश्रा (भा) |
एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११]
सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५]
दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०]
कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१]
संघ
कसोटी | एकदिवसीय | ||
---|---|---|---|
![]() | ![]() | ![]() | ![]() |
- दुखापतीमुळे टीम साऊथीच्या ऐवजी मॅट हेन्रीची न्यू झीलंड कसोटी संघात निवड.[२८]
- पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मार्क क्रेगला उर्वरित मालिकेसाठी संघाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी जीतन पटेलची निवड करण्यात आली.[२९]
- दुखापतग्रस्त लोकेश राहुलऐवजी गौतम गंभीरची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली[३०]
- आजारपणामुळे इशांत शर्माच्या ऐवजी जयंत यादवचा संघात समावेश करण्यात आला.[३०]
- बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी करुण नायरचा समावेश करण्यात आला.[३१]
- पाठीच्या दुखण्यामुळे भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दूल ठाकूरची संघात निवड करण्यात आली.[३२]
- आजारपणानंतर पूर्णपणे तंदरुस्त नसल्याने सुरेश रैनाचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश होऊ शकला नाही.[३३]
सराव सामना
कसोटी सामने
१ली कसोटी
२२-२६ सप्टेंबर धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- २ऱ्या दिवशी चहापानापुर्वी आलेल्या पावसामुळे थांबवण्यात आला आणि शेवटच्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही.[३४]
- भारताचा ५०० वा कसोटी सामना.[१४]
- कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २०० बळी पूर्ण करणारा (३८ कसोटी) रविचंद्रन अश्विन (भा) हा दुसरा गोलंदाज.[३५][३६]
२री कसोटी
३० सप्टेंबर–४ ऑक्टोबर धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- २ऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात पावसामुळे २ तासाचा खेळ वाया गेला.
- भारतीय संघाचा मायदेशी २५०वा कसोटी सामना.[३७][३८]
- केन विल्यमसनला ताप आल्यामुळे त्याच्याऐवजी रॉस टेलरने कर्णधाराची भूमिका पार पाडली.[३९]
- ह्या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघ आयसीसी अजिंक्यपद स्पर्धा क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला.[४०]
३री कसोटी
८-१२ ऑक्टोबर २०१६ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- या मैदानावर खेळवली जाणारी पहिलीच कसोटी.[४१]
- कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारा अजिंक्य रहाणे हा भारताचा ३६वा फलंदाज.[४२][४३]
- कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दोन द्विशतके करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय.[४४][४५]
- विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची ३६५ धावांची भागीदारी ही भारतातर्फे चवथ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[४५][४६]
- रविचंद्रन अश्विनची (भा) कसोटी डावातील तसेच कसोटी सामन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[४७][४८]
- धावांच्या दृष्टीने, कसोटी इतिहासात भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय तर न्यू झीलंडचा दुसरा सर्वात मोठा पराभव[४९]
एकदिवसीय मालिका
१ला सामना
वि | ||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: हार्दिक पंड्या (भा).
- हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना असून इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय सामने भारतीय संघ खेळला आहे.[१५]
- अमित मिश्रचे (भा) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.
- डावामध्ये संघ सर्वबाद होवून शेवटपर्यंत नाबाद राहणारा टॉम लॅथम हा एकूण दहावा तर न्यू झीलंडचा पहिलाच फलंदाज[५०]
२रा सामना
वि | ||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- हा भारताचा ४००वा एकदिवसीय पराभव असून कोणत्याही संघापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय पराभव भारतीय संघाच्या नावावर.[५१]
- रोहित शर्माचा (भा) १५०वा एकदिवसीय सामना.[५१]
- यष्टिरक्षक म्हणून ल्युक रॉंचीचे (न्यू) १०० बळी पूर्ण.[५१]
- आठ किंवा त्याहून जास्त एकदिवसीय शतके काढणारा केन विल्यमसन हा न्यू झीलंडचा पाचवा फलंदाज. तसेच भारताविरुद्ध शतक करणारा तो न्यू झीलंडचा तिसरा कर्णधार आणि भारतामध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज.[५१]
- १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारतात एकदिवसीय विजय आणि फिरोजशहा कोटला मैदानावर पहिलाच विजय.[५१]
३रा सामना
वि | ||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- जेम्स नीशॅम आणि मॅट हेन्री दरम्यानची ८४ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडतर्फे ९व्या गड्यासाठीची सर्वोच्च एकदिवसीय भागीदारी.[५२]
- महेंद्रसिंग धोणीच्या ९,००० एकदिवसीय धावा पूर्ण. तसेच त्याचा भारतातर्फे एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षट्कार आणि कर्णधारातर्फे सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम.[५३]
- विराट कोहलीचे (भा) २६वे एकदिवसीय शतक. ह्या मैदानावरील ही कोणत्याही फलंदाजातर्फे सर्वोच्च धावसंख्या (१५४ धावा).
- विराट कोहलीचे हे यशस्वी पाठलागामधील १४वे शतक. ही त्याची संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकाची कामगिरी.[५४]
- विराट कोहलीच्या मायदेशी सर्वात कमी डावांमध्ये ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण.(६३ डाव)[५४]
- एकदिवसीय क्रिकेट मध्ये १५० यष्टिचीत करणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच यष्टिरक्षक.[५४]
४था सामना
वि | ||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
५वा सामना
वि | ||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: जयंत यादव (भा).
- सी. के. नंदन (भा) यांचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ही न्यू झीलंडची भारताविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या आहे तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांचा सर्वात लहान पूर्ण झालेला डाव आहे.[५५]
- अमित मिश्राची ह्या सामन्यातील कामगिरी ही भारतीय गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील न्यू झीलंडविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[५६]
- विराट कोहलीच्या मालिकेमधील ३५८ धावा ह्या कोणत्याही फलंदाजातर्फे भारत-न्यू झीलंड दरम्यानच्या मालिकेतील सर्वात जास्त धावा.[५६]
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |