ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.[१][२][३] भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४] ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.[५]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | १६ फेब्रुवारी – २९ मार्च २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | स्टीव्ह स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चेतेश्वर पुजारा (४०५) | स्टीव्ह स्मिथ (४९९) | |||
सर्वाधिक बळी | रवींद्र जडेजा (२५) | स्टीव्ह ओ'कीफे (१०) नेथन ल्योन (१०) | |||
मालिकावीर | रवींद्र जडेजा (भा) |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या.[६] बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ.[७] ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.[८]
संघ
![]() | ![]() |
---|---|
- दुसऱ्या कसोटी दरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे मिचेल मार्शला (ऑ) उर्वरित मालिकेमधून वगळण्यात आले आणि त्याच्याऐवजी मार्कस स्टोइनिसची निवड करण्यात आली.[११]
- खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्याला (भा) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१२]
- पायाच्या दुखापतीमुळे मिचेल स्टार्कला (ऑ) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१३] त्याच्याऐवजी पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले.[१४]
- विराट कोहलीच्या खांद्याला दुखापतझाल्याने चवथ्या कसोटीआधी, त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान दिले गेले.[१५]
सराव सामना
प्रथम श्रेणी: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
१ली कसोटी
२३-२७ फेब्रुवारी २०१६ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या मैदानावरील ही पहिलीच कसोटी.[८]
- १०५ ही भारताचा भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे.
- मिचेल स्टार्कच्या (ऑ) १,००० कसोटी धावा पूर्ण.[१६]
- रविचंद्रन अश्विनने (भा) कपिल देवचा भारतातील मोसमातील सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम मोडला.[१७]
- स्टीव्ह ओ'कीफेने (ऑ) कसोटीमध्ये पहिल्यांदाच ५-बळी घेण्याची कामगिरी कामगिरी केली.[१८] त्याने पाच गडी १९ चेंडूंमध्ये बाद केले आणि भारताविरुद्ध सर्वात कमी चेंडूंमध्ये पाच गडी बाद करण्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१९]
- भारताचे शेवटचे सात गडी अवघ्या ११ धावांत बाद झाले, ही कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात वाईट कामगिरी.[१९]
- स्टीव्ह ओ'कीफेची सामन्यातील ७० धावांत १२ बळींची कामगिरी ही भारतातील कसोटीमध्ये परदेशी फिरकी गोलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी तसेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची भारताविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२०]
- २००४ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा आणि २०१२ नंतर कोणत्याही संघाचा भारतातील पहिला विजय.[२०]
२री कसोटी
४-८ मार्च २०१६ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- नेथन ल्योनने (ऑ) परदेशी खेळाडूतर्फे भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.[२१]
- ऑस्ट्रेलियातर्फे नेथन ल्योन हा भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज (५८ बळी), आणि भारताविरुद्ध तीनवेळा सात-गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज.[२१]
- चार वेगवेगळ्या गोलंदाजांनी एका डावात प्रत्येकी ६ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ.[२२]
- रविचंद्रन अश्विनने (भा) सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये (४७) २५ वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[२२]
३री कसोटी
१६-२० मार्च २०१६ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या मैदानावरील हा पहिला कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना.[२३]
- मुरली विजयचा (भा) ५०वा कसोटी सामना.[२३]
- ५,००० कसोटी धावा पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात लहान खेळाडू. तसेच त्याची ही कामगिरी ऑस्ट्रेलियातर्फे तिसरी सर्वात जलद आहे.[२४]
- ग्लेन मॅक्सवेलचे (ऑ) पहिले कसोटी शतक. तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक करणारा तो ऑस्ट्रेलियातर्फे दुसरा आणि जगातील तेरावा फलंदाज.[२५]
- स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल दरम्यानची १९१ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची ५व्या गड्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट भागीदारी आणि ५व्या गड्यासाठी पाहुण्या संघातर्फे भारतातील ४थी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२६]
- स्टीव्ह स्मिथ च्या नाबाद १७८ धावा ह्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारातर्फे सर्वोत्कृष्ट खेळी तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भारतातील तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२६]
- चेतेश्वर पुजाराने (भा) ५२५ चेंडूंचा सामना करताना २०२ धावा केल्या, भारतीय फलंदाजातर्फे चेंडूचा विचार करता कसोटीमधील ही सर्वात मोठी खेळी आहे.[२७]
- पुजारा आणि वृद्धिमान साहा यांची १९९ धावांची भागीदारी ही भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी आहे.[२७]
४थी कसोटी
२५-२९ मार्च २०१६ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: कुलदीप यादव (भा).
- ह्या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना.[२८]
- अजिंक्य रहाणेचा भारताचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[२९]
- स्टीव्ह स्मिथ हा भारतातील मालिकेमध्ये तीन शतके करणारा पहिला ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज.[३०]
- २०१६-१७ मध्ये ७९ बळींसह रविचंद्रन अश्विन (भा) हा एका मोसमात सर्वाधित गडी बाद करणारा गोलंदाज.[३०]
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत