पंचायतन पूजा
- लेख
- चर्चा
पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय.[१]विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली.[२] ह्या पद्धतीनुसार विष्णूपंचायतनात हरी (विष्णू), शिव, गणपती, तेज (भास्कर) आणि देवी (अंबा) ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.[३]
गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानवी विकासात ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.
समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथस्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो.[८] याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-
संदर्भ